top of page

महात्मा गांधी जयंती

MKG1_1728288869921.webp

महात्मा गांधी यांची आज जयंती, त्यांना विनम्र अभिवादन 💐💐🙏

आजच्या या लेखात आपण महात्मा गांधी बद्दल महत्त्वाची माहिती बघू, 

 

Subject : GS - आधुनिक भारताचा इतिहास

 

पूर्ण नाव : मोहनदास करमचंद गांधी

जन्म : 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला.

 महात्मा गांधी हे वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते.

 

 दक्षिण आफ्रिकेतील लढा : 

• दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील खटल्यासाठी गांधीजींची भेट घेतली त्यामुळे गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले.

• 1893 ते 1915 या काळात दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी वर्णद्वेष आणि तिथला अपमान पाहून भारतीय व्यापारी, कामगार यांच्या हक्कांसाठी लढा दिला.

• त्यांनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन नाताळ काँग्रेसची स्थापना केली.

• इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राची सुरुवात केली.

• डर्बन शहराजवळ फिनिक्स आश्रम स्थापन केले.

MKG2_1728286767941.webp
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका :

• 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परतले.

• 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह - पहिली सविनय कायदेभंग चळवळ

• 1918 अहमदाबाद गिरणी कामगार संप (Ahmedabad Mill Strike) - पहिले उपोषण

• 1918 - खेडा सत्याग्रह - पहिलं असहकार आंदोलन

• वरील स्थानिक आंदोलनांनी देशव्यापी लढाई चा पाया मजबूत केला.

• 20 व्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रमुख नेते बनले, त्यांनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देण्यासाठी अहिंसक मार्गाने आंदोलनचा पुरस्कार केला.

MKG7_1728287540049.webp
असहकार चळवळ (1920-1922) :

• गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांड आणि दडपशाही रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी असहकार चळवळ सुरू केली.

• बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल इंग्रजांनी गांधीजींना कैसर-ए-हिंद पदवी 1915 मध्ये बहाल केली होती.

• परंतु जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी 1920 मध्ये गांधीजींनी कैसर-ए-हिंद पदवी परत केली.

MKG4_1728286793829.webp
सविनय कायदेभंग चळवळ (1930) : 

• सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात गांधीजींनी दांडी या मिठाच्या सत्याग्रहापासून केली.

• मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा (1930): ब्रिटीश मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी गांधीजीनी 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत साबरमती आश्रम ते दांडी असा मोर्चा काढला.

MKG5_1728286806092.webp
भारत छोडो आंदोलन (1942) :

• या आंदोलनाला चले जाव आंदोलन म्हणूनही ओळखले जाते.

• भारत छोडो आंदोलन, भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्याची मागणी केली.

• गांधीजीनी या आंदोलनसाठी भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला. 

• त्यांच्या घोषणेने लाखो लोकांना निषेध, संप आणि सविनय कायदेभंगाच्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

MKG6_1728286817681.webp
मृत्यू : 

30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली.

 

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाईनर प्रश्न

 

प्रश्न) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा असतो ?

२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो

 

प्रश्न) महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्व प्रथम कोणी म्हटले ?

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात.

 

प्रश्न) महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोणत्या वर्षी होते ?

1924 मधील बेळगाव अधिवेशन हे एकमेव काँग्रेस अधिवेशन होते ज्याचे अध्यक्ष गांधीजी होते.

bottom of page